Mahila balvikas bharti : 12वी पास वर महिला बालविकास केंद्रात भरती, लगेच अर्ज करा

Mahila balvikas bharti : राज्यातील महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. महिला व बालविकास केंद्रात १२ वी पास महिलांसाठी भरती निघालेली आहे. ही संधी त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी उपयुक्त ठरणार आहे. जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल, तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १७ एप्रिल २०२५ ते २ मे २०२५ दरम्यान आहे.

या भरतीअंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदासाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. भरती करणारी संस्था म्हणजे बाल विकास प्रकल्प अधिकारी व महिला व बालविकास विभाग आहे. अर्जदार बारावी उत्तीर्ण असावा, आणि जर त्याच्याकडे उच्च शैक्षणिक पात्रता असेल, तर त्याचे गुणपत्रक अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

या भरतीसाठी काही आवश्यक अटी आणि पात्रता निकष देखील आहेत. सर्वप्रथम, उमेदवाराचे वास्तव्य संबंधित अंगणवाडी हद्दीत असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे; आरक्षण प्रवर्गातील (अजा, ज, व, घटसंकल्पीत) उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र शासन नियमांनुसार आवश्यक आहे. विधवा, परित्यक्ता, अनाथ, अपंग महिला तसेच अल्प उत्पन्न गटातील महिलांना भरती प्रक्रियेत प्राधान्य दिले जाईल. याशिवाय, पूर्वी अंगणवाडी सेविका किंवा मिनी सेविका म्हणून अनुभव असल्यास अधिक गुण देण्यात येतील. केंद्राच्या भागात वापरल्या जाणाऱ्या भाषेचे ज्ञान असणेही आवश्यक आहे.

निवड ही अर्जदारांच्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे अर्ज फक्त संबंधित अंगणवाडी केंद्रासाठीच स्वीकारले जातील. एकाहून अधिक अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. जर अटी व शर्तींचे पालन न केल्यास अर्ज अमान्य केला जाईल. सर्व आवश्यक कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. अंतिम निवड प्रक्रिया ही बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या निर्णयानुसार होईल व तो अंतिम मानला जाईल.

Leave a Comment